नाशिक ❗अखेर भ्रष्ट, आणि लाचखोर लोकांचा कर्दनकाळ ठरलेल्या जितेंद्र भावे तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या कार्यकर्त्यांवर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल👉खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैर वापर.✍️ सविस्तर ✍️
- अख्खा महाराष्ट्र बोलतोय निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि जितेंद्र भावे सर घाबरू नका जनता तुमच्या पाठीशी आहे..
- नाशिकमध्येही मस्साजोगसारखे प्रकरण शिजत आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. आम्ही उदात्त हेतूने काम करत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर बालंट येऊ नये म्हणून आम्हाला असे खोटे गुन्हे दाखल करुन बदनाम करतात. पोलिसही असे गुन्हे कसे दाखल करतात ? मुळात मी काही दिवसांपासून विपश्यना केंद्रात आहे. अशावेळी मी कुणाकडे खंडणी मागितली यावर कुणाचा विश्वास बसेल ? जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी..
नाशिक✍️ महाराष्ट्र
Updated By- ⭐ स्टार 1 न्यूज मराठी ✍️
❗13 एप्रिल 2025❗ संपादक 🌐सचिन रेवगडे
नाशिक✍️✍️
✍️ काल दि.13 एप्रिल 2025 इंदिरानगर पोस्टे। गुरनं 111/2025 भा. न्या.सं. कलम 308(2), 329(4), 356(2), 356(3), 189(2), 190 प्रमाणे 1) दिगंबर वेडू पाठे 2) जितेंद्र भावे 3) राजेंद्र गायधनी व त्यांच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सात ते आठ कार्यकर्ते वर युसुफ सरदारखान पठाण, (वय 43 वर्षे, रा. पखालरोड, व्दारका, नाशिक.) यांनी गुन्हा दाखल केला आहे.
👉तर गुन्हा दाखल करण्याचे कारण काय तर दिगंबर वेडू पाठे यांची गाडी शहरातील इंदिरानगर परिसरातील अशोक लेलँड कंपनीच्या महावीर व्हील्स या शोरूम मधे दुरुस्ती साठी लावलेली होती.
परतू गाडी मालक यांना आपल्या गाडी चे स्पेअर पार्ट काढून घेतले बाबत शंका आली .शंका नाहीतर गाडी मालक दिगंबर पाठे यांचा आरोप होता की गाडी दुरुस्ती साठी मी 👉युसुफ सरदारखान पठाण यांचा शोरुम मध्ये जी प्रोसेस असते ती केली. इन्शुरन्स क्लेम करून जेवढे पैसे मिळाले तेवढे पण शोरुम वाल्यांना भेटले बाकी माझ्याकडून जे पैसे देणे होते ते ही कंपनी ला दिले गेले अशोक लेलेंड कंपनी कडून जे गाडी चे स्पेअर पार्ट होते ते.युसुफ सरदारखान पठाण यांनी संगनमत करून गायब केले. हे जेव्हा गाडी मालकाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्या शोरुम मध्ये जाब विचारला परतू. तिथे त्यांना हाकलून लावण्यात आले.
खालील लिंक नक्की पहा ✍️✍️
https://www.facebook.com/share/r/15Gjjnyfvn/
👉त्यानंतर पीडित गाडी मालकांनी जितेंद्र भावे सर यांच्या शी संपर्क करून त्यांना झालेला अन्याय सांगण्याचे ठरवले.
परतू जितेंद्र भावे सर हे काही दिवसापासून बाहेर विपश्यना शिबिरात होते .मग गाडी मालक दिगंबर पाठे यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या कार्यकर्त्यां ची भेट घेतली आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मग निर्भय कार्यकर्ते तसेच गाडी मालक दिगंबर पाठे हे अशोक लेलँड कंपनीच्या महावीर व्हील्स या शोरूम मधे दाखल झाले.
👉आणि त्यांनी शोरुम मध्ये जाऊन जाब विचारला परतू त्यांना तिथे काही सहकार्य करण्यात आले नव्हते.त्यानंतर मॅनेजर युसुफ सरदारखान पठाण यांनी गाडी मालक तसेच जितेंद्र भावे आणि अन्य कार्यकर्ते वर खोटा गुन्हा दाखल केला .
परतू ज्या पोलिस स्टेशन मध्ये राजेंद्र गायधनी सह अन्य कार्यकर्ते इंदिरानगर पोलिस स्टेशन मध्ये गेले आणि आमची फिर्याद घ्या बोलू लागले परतू निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या कार्यकर्त्यांची फिर्याद घेता येणार नाही कारण आमच्या कार्यक्षेत्रात ती घटना झाली नाही तुम्ही नजदीक च्या पोलीस स्टेशन मध्ये जा तिथे फिर्याद द्या असे अजब उत्तर तेथील कार्यरथ असलेल्या पीआय मॅडम तृप्ती सोनावणे यांनी दिले मग युसुफ सरदारखान पठाण, यांची फिर्याद कशी नोंद करून घेतली असा सवाल नाशिक कर करत आहे.
भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ ठरलेल्या जितेंद्र भावे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना जेल मधे ठेवण्याचा जणू विडाच तेथील पोलिस अधिकारी यांनी घेतला की काय अशी चर्चा नाशिक मधे रंगू लागली आहे..
👉 भावे म्हणतात, मी विपश्यनेला असताना गुन्हा कसा ?
नाशिकमध्येही मस्साजोगसारखे प्रकरण शिजत आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. आम्ही उदात्त हेतूने काम करत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर बालंट येऊ नये म्हणून आम्हाला असे खोटे गुन्हे दाखल करुन बदनाम करतात. पोलिसही असे गुन्हे कसे दाखल करतात ? मुळात मी काही दिवसांपासून विपश्यना केंद्रात आहे. अशावेळी मी कुणाकडे खंडणी मागितली यावर कुणाचा विश्वास बसेल ?
जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी..
आम्हाला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे.
दिगंबर पाटे यांनी आमच्याकडे तक्रार केली होती. ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्यांच्या वाहनातील अडीच ते तीन लाखांचे पार्ट्स चोरी केले गेल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले.
🔴त्यानुसार पाटे यांनी आमच्याकडे मदत मागितली. आम्ही शोरूममध्ये गेलो होतो अन् गाडी ठेवून त्यांना मदत करण्याची मागणी केली. परंतु शोरूम चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यासंदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात हा वाद गेला. पोलीस निरीक्षक तृप्ती सानवणे यांनी आमची बाजू ऐकून घेतली नाही, त्यांनी शोरूमच्या बाजूनेच आपली बाजू मांडली. जितेंद्र ‘भावे नाशिकमध्ये नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आम्हाला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे.
राजेंद्र गायधनी,
निर्भय महाराष्ट्र पार्टी
✨ फिर्यादी मधे काय ❗✍️
🔴वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे कामास असलेल्या शोरूममधे आरोपीत मजकुर दिगंबर पाठे यांचे अपघातग्रस्त वाहन क्र एम.एच 15 जे.सी 5538 असे दुरूस्ती करण्याकरिता शोरूमच्या ताब्यात लावलेले असतांना वाहनातील स्पेअर पार्ट चेंज केलेले असल्याचे कारण सांगुन दिगंबर पाठे व निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राजेंद्र गायधनी व त्यांच्या पक्षाचे इतर सात ते आठ कार्यकर्ते यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन शोरूममध्ये विनाधिकार प्रवेश करून त्यांचे ताब्यातील मोबाईलमध्ये व्हिडीओ काढुन सदरचे व्हिडीओ आमचे शोरूमची बदनामी होईल व ग्राहकांमध्ये अविश्वास निर्माण होईल या उददेशाने व्हिडीओ चित्रीकरण करून सदरचे व्हिडीओ त्यांचे व जितेंद्र भावे फेसबुक फेसबुक पेजवर लाईव्ह केले व व्हिडीओ फेसबुक पेजवर लाईव्ह झालेनंतर ” तुम्ही आम्हाला अडीच लाख रूपय दया तर ही तक्रार इथच मिटवू नाहीतर आम्ही पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे काहीतरी तक्रारी घेवुन येवुन तुमच्या शोरूमची बदनामी होईल यादृष्टीने आमच्या किंवा आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह व्हिडीओ दाखवु ” असे बोलुन आमचेकडे खंडणीची मागणी करून धमकी दिली म्हणुन गुन्हा.
गुन्हा दाखल करण्याचे कारण काय❗ आणि लाचखोर अधिकारी तसेच भ्रष्ट लोक का हात धुऊन लागेल जितेंद्र भावे तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या मागे.✍️✍️
✍️👉कारण महाराष्ट्र हा लाचखोरी च्या विळख्यात सापडला आहे.ही लाचखोरी थांबता थांबेना. आणि यात सरकारी यंत्रणा ही यात कमी नाही.❗❗❗
❗उलट आता सरकारी कोणताही अधिकारी असू पोलिस अधिकारी असूद्या साधा शिपाई पोलिस असूद्या सगळे लाच घेतात. काही पोलिस कर्मचारी अधिकारी आहे जे आपल्या इनामला जागतात. की ते लाच घेत नाही परतू काही इतके लाचखोर झाले की एकदा मारामारी ची केस असली तरी त्या केस मधे आरोपीला काही त्रास होऊ नये या साठी 50 हजार मागतात.
मग गरिबीने करायचे कसे. जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित होते.
आणि नाशिक मधे पावलो पावली भ्रष्ट आणि नीच कारभार बघावयास मिळतो. काही सरकारी अधिकारी यांनी आपल्या सोबत खाजगी माणूस कार्यरत ठेवला कारण जी लाच घेतली जाते ती याच खाजगी इसमाकडून.मग चोरी पचून जाते.
👉👉मग याला आळा घालण्या साठी एक अवलिया समोर येतो त्याचे नाव जितेंद्र भावे.
हे भावे आदी आम आदमी पार्टी मध्ये होते तेव्हा पासूनच बेधडक काम आणि शासकीय लाचखोर यंत्रणेला घाम फोडणारे तेव्हा पासूनच प्रचलित.
परतू लाचखोर आणि भ्रष्ट कारभार मुक्त भारत करण्याची आम आदमी पार्टी ची भूमिका नव्हती . परतू सच्चा देश प्रेमी असेल तर त्याला भ्रष्टाचार मुक्त भारत होवा हीच अपेक्षा असते . आणि जितेंद्र भावे सरांची हीच आधीपासून भूमिका.
स्वच्छ आणि सरळ माणूस.✍️✍️
उलट दुसऱ्याला मदत करून त्याचाकडून आग्रह चा चहा ही न घेता स्वतः च्या पैशातून त्यांना चहा पाहणारे असे हे जितेंद्र भावेयांचे लाचखोरी रोखणे तसेच शासकीय कार्यालयात पारदर्शी काम होणे हीच अपेका आज पर्यंत आहे.
🔴परतू लाचखोर लोकांचे पितळ उघडे करणे आम आदमी पक्षाला टोचत असल्याने. जितेंद्र भावे यांना आम आदमी पार्टी तून निलंबित करण्यात आले.
नंतर च्या काळात त्यांनी आपला भ्रष्टाचार मुक्त भारत लढा सुरूच ठेवला. त्यातच कोरोना काळात सगळे लोक जीव वाचवण्याचा नादात घरा बाहेर पडत नव्हते परतू. जे लोक हॉस्पिटल मधे उपचार घेत होते त्यांचे बिल हे लाखो च्या घरात निघत होते. तेव्हा ही गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी जितेंद्र भावे हे हॉस्पिटल मधे जाऊन जाब विचारत. परिणामी एका हॉस्पिटल मध्ये अंगावरील कपडे काढून उपोषणाला बसले होते. तेव्हा ही त्यांचावर गुन्हा दाखल झाला होता. परिणामी त्या डॉक्टरांना आपली चूक समजली आणि गुन्हा मागे घेतला..
नंतर त्यांनी आपली स्वतःचा पक्ष काढला. निर्भय महाराष्ट्र पार्टी. त्यात अनेक सहकारी सहभागी झाले. आणि जनतेला सांगू लागले की या देशाचे तुम्हीच मालक आहात.. सो शासकीय यंत्रणेला कामाबद्दल जाब विचारा ..
⭐⭐खरे बघता लोकांपुढे आज असा समज की कोणताही शासकीय अधिकारी असो आपला मालक. त्याचा पुढे सर्वसामान्य माणूस काही बोलू शकत नाही मनमानी कारभाराविषयी त्याला जाब विचारू शकत नाहि..✍️✍️
✍️✍️👉परतू निर्भय महाराष्ट्र पार्टी ने जनतेला सांगितलं की आपण या देशाचे मालक आहोत.. जो कामचुकार पना करतो जो लाच घेतो त्याला चांगला धडा शिकवा
आज नाशिक मधे अनेक सरकारी नोकर लाच घेतात. साधा दाखला लवकर मिळावा यासाठी 500 रुपये मागितले जातात.. तसेच कार बाईक कर्ज तसेच घर कर्ज देणाऱ्या बँका यांचे एजंट यांनी तर नाशिक शहरात उत्पाद माजून ठेवला आहे.
खाजगी एजंट चौका मध्ये थांबून हफ्ते थकणाऱ्या लोकांच्या गाड्या अडवतात आणि गाडी मधे लहान मुले असू म्हातारे माणसे असू त्यांना भर रस्त्यावर सोडून देऊन गाडी जप्त करून नेतात. नंतर गाडी मालक न्याय मागण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या कार्यकर्त्यां ना आणि जितेंद्र भावे सर यांना कॉल करून सांगतात मग ती गाडी सोडून दिली जाते..
👉खरं तर नाशिक मध्ये भावे सर आणि त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरून पिडीतांना मदत करतात सरकारी कार्यालयात जाऊन कामचोर अधिकारी यांना धडा शिकवतात.
त्यामुळे लाच खोर सरकारी अधिकारी यांचा कर्दनकाळ ठरलेल्या जितेंद्र भावे तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टी चे कार्यकर्ते वर केव्हा खोटे गुन्हे दाखल होतील आणि केव्हा ते जेल मधे जातील याची वाट हे बघत आहे.
✍️परिणामी काल असाच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.परतू नाशिक कर बोलतात की सगळ्या महाराष्ट्र ला माहिती जितेंद्र भावे कसे आहे. शेवटी सत्याला त्रास हा होतो.
👉👉अख्खा महाराष्ट्र बोलतोय निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि जितेंद्र भावे सर घाबरू नका जनता तुमच्या पाठीशी आहे..
❗ Updated by स्टार वन न्युज मराठी संपादक ✍️