
रविवार, दि. ११ मे २०२५
- एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची आता रात्रपाळी बंद होणार आहे.
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.
माणगावच्या 57 व्या एसटीच्या अधिवेशनात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.
तसेच सरणाईकानी उपाध्यक्ष माधव कुशीकर यांना सुचवले की महिला मंडळ यांना किमान आठ – नऊ वाजेपर्यंत कशी त्यांची ड्युटी संपेल याची खबरदारी आपल्या महामंडळाने घेणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे आपल्या महिला भगिनींच्या माध्यमातून जी ही मागणी उपस्थित केली होती याबाबत त्यावर आता महामंडळाने सुद्धा हिरवा कंदील दिलेला आहे.