
गुरुवार, दि. २२ मे २०२५
मुंबईतील स्थानिक भागात जलमार्गाने प्रवास किंवा फिरायला आता सहज सुलभ झाले आहे.
२६ जानेवारी २०२५ या दिवसापासून सुरु झालेल्या फेरीबोटचा आनंद घेणारे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे फेरिसर्विसने वेळापत्रकाची आखणी प्रवाशांच्या सोयीसाठी केलेली आहे.
जाऊन – येऊन आपणास या बोटीने १५ फेरी दिवसभरात करण्याचे नियोजन फेरिसर्विसने आपल्याला उपलब्ध करवून दिलेली आहे.
या सेवेने प्रावस करण्यासाठी तिकिटाप्रमाणे काही शुल्क आकारले जाणार आहे.
१२ वर्षावरील —– ३० रुपये.
३ ते १२ वर्षा पर्यंत —- १५ /-
आपल्यासोबत असलेली दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, प्राणी , बस, ट्रक किंवा ट्रॅक्टर या सर्वांचे दर खालीलप्रमाणे दिलेले आहे.
वीस मिनिटांचा हा जलप्रवास आपल्या मनाला स्पर्श करणारा ठरतो.
वसई बंदरात उतरल्यावर तेथे आपल्याला जवळच किल्ला पाहायला भेटतो.
आत मधून हा किल्ला मोठा असून जाण्या- येण्यासाठी पायवाट सुद्धा आहे.
अडीचशे वर्षाचा इतिहास या किल्ल्याला असल्याची माहिती तेथील रहिवासी देतात.